पर्व – डॉ एस एल भैरप्पा / मराठी भावानुवाद – डॉ सौ उमा कुलकर्णी
लहानपणापासून मी महाभारत अनेकदा वाचलंय , कधी गोष्टीरूपात तर कधी कादंबरी स्वरूपात. या प्रत्येक वाचनात महाभारता बद्दलचं गूढ वाढतच गेलं व नंतर हळूहळू ते वाढलं कि महाभारत हे वास्तववादी न वाटता एक रचित काल्पनिक कथानक वाटू लागलं व याला कारणीभूत होत्या उदात्तीकरण केलेल्या काही घटना. मृत्युंजय वाचताना कर्ण आवडला तर युगंधर वाचताना कृष्ण मोहवून गेला. अर्जुनादी पांडवांनी पण मनात चांगलंच घर केलं.इतक्या पिढ्यांचं इतकं सुसंगत वर्णन एखादा कथाकार कसं रचू हेही कळत नव्हतं पण बऱ्याचश्या अवास्तव वाटणाऱ्या घटना सत्यतेची ग्वाही देऊ शकत नव्हत्या. पण डॉ एस एल भैरप्पा यांचं डॉ सौ उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेलं पर्व हे पुस्तक हातात पडलं व अनेक गोष्टींचा सहज उलगडा झाला आणि महाभारत खरं असावं कि खोटं? हे द्वंद्व देखील संपलं.
More info →

