Ranganathaswamy Temple Srirangam
Ranganathaswami

Interesting Story of Largest Temple of India – The Ranganathaswamy Temple Srirangam

Ranganathaswami-Painting at Ranganathaswamy Temple SrirangamIndia’s Largest Temple and World’s Largest Hindu Temple in Worship. The Ranganathaswamy Temple spans an area of 156 acres in Srirangam, north of the city of Tiruchirappalli in the State of Tamilnadu. The Temple consists of 7 concentric rectangular Enclosures with the enclosing walls (Prakaras) having Gopuras at the centre of each wall. The Main entrance is from the South Side which is explained by a Local Legend, which takes us back to Ramayana period and has been attributed to Ravana’s brother Bibhishana, whose image is seen on a column depicting the story.

Map of Ranganathaswamy Temple Srirangam
रंगनाथस्वामी मंदिरातील आतील ४ कोट

Out of 7 enclosures, the outer 3 enclosures are fully populated and are inhabited by various residents and shopkeepers like a village. The outermost enclosure has a Gopura of 236 feet, which is the Highest Gopura in the world and hence called Rajagopuram. The Story related to this Gopuram & the Temple is narrated here in MARATHI (मराठी)

भारतातील सर्वात मोठ्या पूजित मंदिराची अजब कहाणी

रंगनाथस्वामी मंदिर हे तमिळनाडूच्या त्रिचनापल्ली येथील विष्णुमंदिर. सुमारे १५६ एकर चा विस्तार असलेले हे प्रचंड मंदिर भारतातील नव्हे तर जगातले, पूजेत असलेले, सर्वात मोठे मंदिर आहे(अंगकोर वाट यापेक्षा मोठे आहे पण हिंदू पुजेचे मंदिर नाही). या मंदिराच्या गाभाऱ्यात केवळ हिंदूंनाच प्रवेश दिला जातो. सर्वसाधारणपणे मंदिरे पूर्व , पश्चिम अथवा उत्तर मुखी असतात पण हा रंगनाथ स्वामी मात्र दक्षिणेकडे पहात शेषावर पहुडला आहे आणि त्याची एक सुंदर कहाणी आहे.

मंदिराची दंतकथा

Bibhishana-with-Vimana-Ranganathaswamy Temple Srirangamरावणवधानंतर श्रीराम अयोध्येला परतले. रामाच्या राज्याभिषेकाला हनुमंतासहित बिभीषण देखील उपस्थित होता. श्रीरामाचा वियोग आता आपल्याला होईल या विचाराने तो अस्वस्थ झाला. तेव्हा श्रीरामांनी त्याला आपल्या ईश्वाकू वंशातील श्री रंगनाथ स्वामींची मूर्ती दिली व ती माझा वियोग तुला जाणवू देणार नाही असेही सांगितले, पण अट एकच, नेताना ही मूर्ती कुठेही खाली ठेवायची नाही (गोकर्ण महाबळेश्वर कथेतील रावणाला शंकराने घातलेली अट). इथेही देवांना पुन्हा काळजी पडली, रंगनाथ स्वामी लंकेत पोहोचले की लंकेची भरभराट होईल. स्वर्गाचे महत्त्व कमी होईल. बिभीषणाचे ठीक आहे , पण त्याच्यानंतरचा राजा कोण असेल ? कसा असेल ? त्यामुळे हे थांबवायला हवे. पुन्हा ही कामगिरी गणपतीकडे सोपविण्यात आली. यावेळी बिभीषण संध्या करण्यासाठी त्रिचनापल्लीला थांबला. गुराखी गणपतीला रंगनाथाची मूर्ती सांभाळायला दिली. गणपती म्हणाला, माझ्या मालकाने बोलावल्यावर मी तुला ३ हाका मारेन. आलास तर ठीक नाहीतर मूर्ती तिथेच ठेऊन मी परत जाईन. बिभीषण संध्या करायला उतरला व इकडे गणपतीने ३ वेळा त्याला ऐकू जाणार नाही अशा आवाजात हाका दिल्या, आणि रंगनाथाला तिथेच ठेऊन निघून गेला.

बिभीषण परतला आणि पहातो तर रंगनाथ स्वामी जमिनीवर व गुराखी गायब. त्याने देवाला विनंती केली, पण देवाने सांगितले की मी इथेच थांबून तुझ्या राज्यावर नजर ठेवेन आणि म्हणून इथला रंगनाथ स्वामी दक्षिणमुखी आहे. या कहाणीशी संबंधित विमानातून रंगनाथ स्वामीला लंकेला नेणारा बिभीषण येथील खांबावर कोरलेला आपल्याला पाहायला मिळतो.

कदाचित याच कारणास्तव (रंगनाथ स्वामीचे श्रीलंकेवर लक्ष रहावे म्हणून ) दक्षिण दरवाजा कमी उंचीचा म्हणजे गोपुर नसणारा होता. पण १९७० च्या सुमारास मंदिर व्यवस्थापनाने तो मुख्य दरवाजा असल्याने वाढविण्याचा व त्यावर उंच गोपूर बांधण्याचा निर्णय घेतला व १९८७ साली हे गोपुर पूर्ण झाले.

याबरोबरचा योगायोगाचा भाग असा की हे गोपूर पूर्ण झाले आणि रंगनाथाची लंकेवरची कृपादृष्टी हटली व दुर्दैवाचे दशावतार सुरु झाले. दहशतवाद फोफावला, आर्थिक अरिष्टाच्या सावटाखाली देश आला. हे टाळण्यासाठी माजी राष्ट्राध्यक्ष चंद्रिका कुमारतुंगा यांनी रंगनाथस्वामीचे मंदिर श्रीलंकेतच निर्माण करायचे ठरविले होते पण त्यानाही सत्तेपासून पायउतार व्हावे लागले, आणि त्यांचे स्वप्नही अधुरेच राहिले.

अशा या भव्य मंदिरामध्ये मोठ्ठा गरुडमंडप आहे ज्यावरील खांबांवर अनेक शिल्पकृती कोरलेल्या आहेत. मंदिर परिसरात अनेक छोटी मंदिरे आहेत यातही कृष्ण अर्जुन, राम-लक्ष्मण-सीता-हनुमंत ही मंदिरे पाहण्यासारखी आहेत. या गरुड मंडपाच्या बरोबर समोर शेषशायी विष्णुंची मोठी मूर्ती असलेले मुख्य मंदिर आहे. काळ्या रंगाची ही पहुडलेली मूर्ती, गाभाऱ्यात असलेल्या अपुऱ्या प्रकाशामुळे, नीट निरखून पहावी लागते.

दुसऱ्या आख्यायिकेनुसार, सनक म्हणजेच चार बाल ऋषी, श्रीरंगममध्ये रंगनाथाच्या दर्शनासाठी आले. त्यावेळी रंगनाथाची विश्रांतीची वेळ असल्याने, त्यांना वैकुंठाच्या जय आणि विजय या द्वारपालकांनी रोखले. अनेकदा विनंती करूनही त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. रागाच्या भरात चौघेही द्वारपालकांना शाप देत निघून गेले. द्वारपालकांनी विष्णूजवळ जाऊन त्याला शापाबद्दल सांगितले. रंगनाथाने सांगितले की तो शाप परत करू शकणार नाही आणि त्यांना दोन पर्याय दिले. (१) तीन जन्मांत विष्णूचा विरोध करणारे राक्षस म्हणून जन्म घ्या किंवा (२) पुढील सात जन्मांत चांगला मनुष्यजन्म घ्या. परमेश्वरासोबत परत येण्यास उत्सुक असलेल्या द्वार पालक जय विजयानी असुर योनीत जन्म घेणे आणि असे मानले जाते की त्यांनी पहिल्या जन्मात हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू म्हणून जन्म घेतला ; दुसऱ्या वेळी रावण आणि कुंभकर्ण म्हणून ; तर तिसऱ्या वेळी शिशुपाल आणि दंतवक्र. विष्णूने प्रत्येक जन्मात या राक्षसांना मारण्यासाठी अनुक्रमे वराह, नरसिंह, राम आणि कृष्ण असे चार अवतार धारण केले. पण प्रत्येक जन्मात त्यांच्या दुष्टपणाची तीव्रता कमी होत गेली म्हणून हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपूला मारण्याकरिता विष्णूला दोन पूर्ण अवतार लागले तर रावण आणि कुंभकर्णाना त्याने केवळ एकाच म्हणजे रामावतारात संपविले आणि शिशुपाल व दंतवक्र तर त्याच्या अवताराच्या विरोधातील मुख्य पात्रेही नव्हती.

रंगनाथस्वामी मंदिराचा विस्तार
Rajagopuram-Ranganathaswamy Temple Srirangam
रंगनाथस्वामी मंदिराचे सर्वात उंच दक्षिण गोपुर – राजगोपुरम

१५५ एकरच्या प्रचंड विस्तारात सामावलेले हे ७ कोट असलेले प्रचंड विस्तीर्ण मंदिर आहे. या सातव्या कोटाचेच गोपुर जगातील सर्वात उंच गोपुर असून २३६ फूट उंचीचे हे गोपुर २५ मार्च १९८७ मध्ये पूर्ण केले गेले, आणि आता राजागोपुरम म्हणून ओळखले जाते. ६ व्या कोटाची गोपुरे होयसळ (१३ वे शतक) व पांड्य (१४ वे शतक) यांच्या कालावधीत बांधली गेली असावीत असे त्यांच्या शैलीवरून वाटते. तर ५ व्या कोटाच्या गोपुरांवर चोला राजांचा प्रभाव जाणवतो.

याच्या बाहेरील ३ कोटांमध्ये तर आता गाव वसलेले असून इतर ४ कोट मंदिरासाठी राखून ठेवण्यात आलेले आहे.

रंगनाथस्वामी मंदिराच्या इतिहासाचा आढावा

भारताच्या धार्मिक इतिहासात या वैष्णव मंदिराला अनन्यसाधारण स्थान आहे. याच्या निर्मितीचा निश्चित कालावधी सांगता येणे कठीण असले तरी ७ व्या शतकापासून ते दहाव्या शतकात चोला राजांच्या कालखंडात याच्या अस्तित्वाचे साहित्यिक पुरावे सापडतात. यानंतर ११ व्य शतकातील चोला राजांनी दिलेली दानपत्रे देखील आहेत. हिंदू धर्माचा विशिष्ट अद्वैत सिद्धांत मांडणाऱ्या रामानुजाचार्यांचा उदय याच सुमारासचा . त्यांनी याच मंदिराला आपले स्थान बनवले होते जे आजही त्यांच्या स्मृतिवशेषांच्या स्वरूपात जपले जाते. मंदिराच्या दक्षिण द्वाराने ४ थ्या कोटात (म्हणजे सध्या मंदिराच्या सर्वात बाहेरच्या) शिरल्यावर उजव्या हाताला (पूर्वेकडे) रामानुजचार्यांची समाधी आहे. येथे त्यांचे बैठे शव गेली ९०० वर्षे जतन करुन ठेवले आहे.हा रामानुजाचार्यांचा देह असल्याचे सांगितले जाते. (आम्ही पाहिल्यावर आंम्हाला तो देह इतक्या सुस्थितीत वाटलं की तो इतक्या दीर्घकाळ टिकला असेल असे खरे वाटले नाही… असो). रामानुजाचार्यांनी अगदी काश्मीरपर्यंत प्रवास केला होता. आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांना चोला राजाच्या जावयाने काही कारणाने दंडित केले व त्यांना म्हैसूर च्या होयसळ राजवटीच्या आश्रयाला जावे लागले.

हे मंदिर चोल राजांच्या राजवटीत प्रथम बांधले गेले असण्याची शक्यता आहे. आठव्या व नवव्या शतकातील तामिळ संत साहित्यात (अल्वर साहित्य) या मंदिराचा उल्लेख येतो. पुढे दहाव्या शतकातील तामिळ साहित्यात या मंदिराचे उल्लेख सापडतात. चोलांनी या मंदिराला देणग्या दिल्याचे उल्लेख येतात. चोल, चालुक्य चोल, पांड्य अशा अनेक राजांच्या राजवटी श्रीरंगम वर राज्य करत असतानाच पुढे १३११ मध्ये मलिक काफूरची वक्रदृष्टी या व आसपासच्या प्रदेशाकडे वळली आणि त्याने या मंदिराची लूट केली. त्यामुळे येथील मूर्ती पुन्हा घडवावी लागली. पुन्हा १३२३ मध्ये मुहंमद बिन तुघलक आला आणि त्यानेही मदुराई व आसपासच्या प्रदेशातील लोकांवर अनन्वित अत्याचार केले. त्याने तर या मंदिरातच तळ ठोकला होता. पण त्याआधीच या मंदिरातली सर्व संपत्ती तिरुपतीला हलविल्याने सुरक्षित राहिली.
यानंतर दक्षिणेत विजयनगर साम्राज्याचा उदय झाला आणि त्यांनी बाजी उलटविली. मंदिराची पुनर्स्थापना केली. तिरुपतीला नेलेली मूर्ती आणि दागिने परत आणले गेले व रंगनाथाचे वैभव त्याला परत मिळाले. त्याचे आज असलेले स्वरूप हे मुख्यत्वेकरून विजयनगर साम्राज्यामुळे मिळाले आहे. पुढे विजयनगरचे साम्राज्य लयास गेल्यानंतर स्थानिक नायकानी या मंदिराच्या संरक्षणत व जडणघडणीत हातभार लावला. यानंतर श्रीरंगम वर जरी अर्कोट च्या नबाबाचे अधिपत्य असले तरी मंदिराचा फारसा ह्रास झाला नाही. ब्रिटिश , फ्रेंच या सत्ता देखील या सुमारास भारतात मूळ धरू लागली होत्या. त्यानंतर १७८१ च्या सुमार हैदर अली आणि १७९० च्या सुमारास त्याच मुलगा टिपू यांनीदेखील काही काळ श्रीरंगम ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण तो फार काळ यशस्वी झाला नाही. आणि पुढे १८०१ मध्ये तर श्रीरंगम ब्रिटिशांच्या ताब्यात गेले.

संदर्भ – Sri Ranganathaswami, A Temple of Vishnu in Srirangam by Jeannine Auboyer (First Edition, June 1969… Current Ninth Edition 2019)

इतर शिल्पाकृती

याच्या समोरच एक सुंदर मूर्तिकाम असणारा “शेषराया मंडप” आहे. या मंडपाच्या खांबांवर टाचा उंचावलेल्या घोड्यावर बसलेला स्वार व या घोड्याच्या टाचेखाली आलेले विविध प्राणी यांची सुंदर शिल्पे दिसून येतात. यात या प्राण्याच्या शरीरात घुसलेल्या तलवारी बारकाईने दाखविल्या आहेत. या मंडपातच बिभीषणाची वर सांगितलेली कथा आहे व तसेच मगरीच्या तावडीतून सुटणाऱ्या हनुमंताची देखील.

हनुमंत आणि कालनेमी

मूर्च्छित पडलेल्या लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी हिमालयातून संजीवनी वनस्पती रात्रभरात आणण्याची जबाबदारी हनुमंतावर सोपवली जाते. हि बातमी हेरांकरवी रावणाला कळताच त्याच्या वाटेत विघ्न आणण्याकरिता रावण आपल्या कालनेमी नावाच्या मायावी राक्षसाला त्याला आधीच वाटेत गाठून वेळकाढूपणा करावयास सांगतो. त्याप्रमाणे अनिच्छेनेच का होईना, पण कालनेमीला जावेच लागते. तो एका साधूच्या वेशात पुढे जाऊन हनुमंताच्या वाटेवर थांबतो. त्याचा फसवा रामनामाचा जप ऐकून हनुमान काही काळ विश्रांतीसाठी थांबायचे ठरवितो. त्याच्याबरोबर बोलण्यात कालनेमी वेळ काढू लागतो. हनुमंताला पाणी हवे असते तेव्हा तो त्याला शेजारच्या सरोवरावर पाठवतो. तेव्हा एक मगर हनुमंताला पकडून गिळते. पण शक्तिशाली हनुमंत तिचे पोट फाडून बाहेर येतो, तेव्हा तिचा उद्धार होऊन त्याच्या जागी एक अप्सरा प्रकट होते व ती स्वर्गलोकी जाण्यापूर्वी कालनेमीच्या हेतूबद्दल हनुमंताला अवगत करते.

हनुमंत परत येतो व कालनेमीचा वध करतो आणि पुढे आपल्या कार्याला निघून जातो आणि जेव्हा त्याला ती संजीवनी वनस्पती नेमकी समजत नाही तेव्हा अक्खा द्रोणागिरी पर्वतच घेऊन परततो. अशी ती कथा.

यापैकी साधुवेशातील कालनेमी व त्याला भेटणारा हनुमंत, मगरीच्या पोटातून बाहेर येणारा हनुमंत व त्या मगरींद्वारे प्रकट झालेली अप्सरा आणि नंतर कालनेमीला फरफटत नेणार हनुमंत या गोष्टी ३ वेगळ्या पॅनेल्स मध्ये अतिशय उत्तमप्रकारे शिल्पित केल्या आहेत.

याच शेषराया मंडपाच्या समोरचा भला मोठ्ठा १००० खांबी मंडप आहे. प्रत्यक्षात यात ९५३ खांब असल्याची माहिती मिळते. प्रत्येक वेळी येथे प्रवेश दिला जात नाही.

गरुडमंडप

याच्या पुढे आता शिरल्यावर आपल्याला एक भलीमोट्ठी गरुडमूर्ती असलेला गरुडमंडप लागतो. या मंदिराच्या गरुडमंडपात असलेली गरुडाची मूर्ती कदाचित भारतातील गरुडाची सर्वात मोठी मूर्ती असावी. याच्या बरोबर समोरच्या गाभाऱ्यात शेषशयनी रंगनाथस्वामी म्हणजेच श्रीविष्णूची २१ फूट लांब (६.४ मीटर) काळ्या दगडातील अतिशय सुंदर मूर्ती आहे. या गरुड मंडपाच्या विविध खांबांवर देखील काही सुंदर शिल्पे देखील आहेत. यात पक्षाला भरविणारी बालिका, इरले घातलेला गुराखी बालक, गोपींची वस्त्रे पळवून झाडावर बसलेला श्रीकृष्ण आणि झाडाखाली त्याची विनवणी करणाऱ्या गोपी, गरुडाच्या खांद्यावर बसलेला विष्णू, बासरी वाजविणारा श्रीकृष्ण, नृसिंहावतार, कालियामर्दन अशी काही शिल्पे उल्लेखनीय आहेत.

(टिप-मंदिराच्या गाभाऱ्यात देखील बरीच शिल्पे आहेत पण आत मोबाईल वापरता येत नसल्याने येथील फोटो घेता येत नाहीत).